“अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य सम्मेलन मुंबई”

अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन , मुंबई 

नागपूर विभागीय दौरा 
दि . 03 – 09 – 2017 ला नागपूर येथे जागृती अभियान द्वारा आयोजित कार्यक्रमात मुंबई येथे होणाऱ्या अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलनाबाबत सर्व बांधवांनी सहकार्य करावे . फक्त निधी घेणे वा देणे हेच सहकार्य नसून साहित्य व समाज घडविन्यात आपण प्रचंड शक्तीने पुढाकार घ्यावा . असे आवाहन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री राजू नाईक साहेब यांनी केले . 

     सदर कार्यक्रमात IIT गुरूकुल चे संचालक मा प्रविण पवार यांची  ऑल ई बं सेवा संघ , महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली . याप्रसंगी , समाजात स्वाभिमान जागृती करणारे साहित्य व नवतरुण कार्यकर्त्याची फळी निर्माण करणे गरजेचे आहे . तसेच समाजाशी होणारे विविध धोके व धोकेबाज यांना यापुढे माफ करून चालणार नाही . असे मत नव युवाध्यक्ष प्रविण पवार यांनी मांडले . 

    मुंबई येथे होणारे संमेलन हे साहित्य चळवळीला तसेच गोरबंजारा समाजाला गौरवान्वित करणारे असेल याकरिता आपले सर्वांचे सहकार्य हवे . असे आवाहन संयोजक मा सुखी चव्हाण यांनी केले . 

    कार्यक्रमाला मंचावर विराजमान मा राजूसिंग नाईक साहेब , मा प्रविण पवार , मा सुखी चव्हाण , मा सुनील राठोड , मा प्रा दिनेश राठोड , मा रामधन राठोड नायक , मा बी एस राठोड , मा बद्रीप्रसाद चव्हाण , मा दिलीप राठोड  , मा आरजूनिया भुकिया आदी मान्यवारांची उपस्थिती लाभली . 

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अशोक पवार  व संचालन श्री होमसिंग पवार यांनी केले आयोजनात विशेषतः  श्री हरीश चव्हाण , श्री नीरज राठोड , श्री अशोक पवार , श्री होमसिंग पवार , श्री रविंद्र चव्हाण घाटंजी , सुदाम राठोड विजय जाधव  निखिल पवार , विनोद राठोड , सुशील पवार , युवराज चव्हाण व मित्र मंडळीचे सहकार्य योगदान मिळाले .

धन्यवाद…..

माता,सुखीभाऊ चव्हाण 

बदलापुर मुंबई महाराष्ट्र राज्य 

सौजन्य-: गोर कैलास डी राठोड