Headlines

औरंगाबाद मराठवाडा मराठी साहित्य परिषदेतर्फे प्रा. मोतीराज राठोड यांचा सत्कार

औरंगाबाद (प्रतिनिधी) : साहित्य अकादमी भारत सरकार तर्फे 2014 वर्षाचा राष्ट्रीय भाषा सन्मान प्रा. मोतीराज राठोड यांना मिळाला. त्याकरिता त्यांचा मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे सत्कार दि. 20-12- 2014 रोजी ज्येष्ठ दलित साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे सर यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता साहित्य परिषदेमध्ये देण्यात आला आहे. यावेळी डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. मोतीराज राठोड यांच्या साहित्य आणि…

Read Full News

प्रेरणादायी व्यक्तीमत्व श्रावणसींग राठोडः इंदौर

सामाजिक बांधिलकी, समाजऋण, समाजाचा उत्थान ह्या हेतूने प्रेरीत झालेले समाजसेवक श्रावणभाया राठोड संपूर्ण भारतात बंजारा समाजाच्या उद्धारासाठी जातीने हजर राहतात. आमच्या विनंतीला मान देऊन 2012 मध्ये रामनवमी निमित्त उमरी पोहरादेवी येथे संपन्न झालेल्या बंजारा सांस्कृतिक महोत्सवात करतारसिंग तेजावत व आपल्या नातवांना सोबत घेऊन सहभागी झाले होते. 2013 मध्ये नांदेड येथे वधू-वर परीचय मेळाव्यात इंदौर येथील…

Read Full News

गोर तत्वांचा वेध : विरेणा

गोर बंजारा समाजामध्ये भाऊ व बहिन यांचे नाते अत्यंत पवित्र व प्रेमळ नाते, मानले जाते. बालपणापासून तारुण्यात येई पर्यंत त्यांनी एकमेकांशी जोपासलेला जिव्हाळा व घरातील कौटुंबिक संस्कार यामुळे भाऊ बहिणीच्या विचारात एक वाक्यता निर्माण झालेली असते. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सामुहिक कार्य व सामुहिक जबाबदारी या संस्कारातून त्यांची वाढ झालेली असते. भाऊ आपल्या बहीणीला आपल्या काळजाचा…

Read Full News

सेवाभायार बोल

मागील भागात आपण संत सेवादास, रामचंद्र सात, धर्मिसात यांनी भगवंतानी दिलेली शक्ती, निपुणता वापरुन संकट समयी ऐक्य निर्माण करुन संकटाचे निवारण केले, संत धर्मिसात यांनी संकट समयी बालाजीने दिलेले शक्ती वापरुन जलवृष्टी थांबवली, संत रामचंद्र सात यांनी पेढारियाशी बुद्धकरुनी संकट निवारीले पण, गंगाभरुन चाललेली आहे. मला जगदंबा यांनी संकट जाणविले आहे. आणि तिच पूर्ण करेल….

Read Full News

गोरबोली, संस्कृती जपायची असेल तर बंजारा भाषांकडे लक्ष हवे

महाराष्ट्रात बंजारा समाज फार मोठय़ा प्रमाणात विखुरलेला आहे. त्यांची एक वेगळी भाषा आहे. संस्कृती आहे, वेषभूषा आहे. या विखुरलेल्या बंजारा समाजात बंजारी, लमाण, धाडी, मथुरा वंजारी इत्यादी भाषा बोलल्या जातात. या भाषा जतन करावयाच्या असतील तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेषतः शिक्षण खात्याने त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. बंजारा समाज त्यांची भाषा गोरबोली, संस्कृती जपायची असेल तर…

Read Full News
Sant Sevalal Movie

‘संत सेवालाल’ चित्रपटाचे भारतभर मोफत प्रक्षेपन

मुंबई (प्रतिनिधी) : सर्व बंजारा समाज बांधवांना कळविणयात येत आहे की, संपूर्ण विश्वात वसलेल्या बंजारा समाजाचे एकमेव आराध्य दैवत जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांचे सत्य ठरलेले अमृतवचन, त्यांची क्रांतिकारी महिमा तसेच भव्य रुपेरी पडद्यावर होणारे त्यांचे दिव्य दर्शन या सर्वांची प्रत्यक्ष अनुभूती करुन देण्यासाठी येणार्या 15 फेब्रुवारी 2015 रविवार रोजी त्यांच्या 276 व्या जयंती…

Read Full News

मा. किसनराव राठोड यांनी महंत दुर्गादास महाराज यांना रोख 2 लाख रुपये निधी

पुणे : तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बावणलाल महाराज देवस्थान ट्रस्टच्या मंदिर जिर्णोद्धारासाठी पुणे येथील बंजारा समाजाचे उद्योजक मा. किसनराव राठोड यांनी महंत दुर्गादास महाराज यांना रोख 2 लाख रुपये निधी देऊन त्यांचा सत्कार करत असताना दिसत आहे.

Read Full News

कॅनडातील टोरांटोत कु. प्राजक्ता राठोडच्या चित्रकृतीची वाह…वाह..

कारंजा लाड (प्रतिनिधी) : कारंजा येथील जे.डी. चवरे विद्यामंदीरातील इयत्ता 10 वीत शिकणार्या कु. प्राजक्ता सह 25 विद्यार्थ्यांच्या 27 चित्रकृतीचे प्रदर्शन कॅनडामधील टोरांटो येथे नुकतेच संपन्न झाले. या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रकृतीने टोरांटोवासियांना थक्क करुन टाकले. प्रत्येक प्रेक्षकाकडून बालकांची वाह…वाह.. करण्यात आली असल्याचे भारतात कामानिमित्त आलेल्या अनिवासी भारतीय सुनिता काण्णव यांनी सांगितले. तसेच या सर्व बालचित्रकारांचा…

Read Full News

बंजारा समाजाचा युवक-युवती परिचय मेळावा संपन्न

यवतमाळ (प्रतिनिधी): भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या वतीने पल्लवी लॉन, आर्णी रोड, यवतमाळ येथे सर्वशाखीय बंजारा समाजातील युवक-युवतींचा राज्यस्तरीय परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवीका श्रीमती अनुताई राठोड होत्या. मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्यचे महसूल राज्यमंत्री मा.ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहकार नेते ऍड. शंकरराव…

Read Full News

डॉ. मोहन चव्हाण चिदगिरीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

नांदेड (प्रतिनिधी) : डॉ. मोहन चव्हाण यांना दि. 21-12-2014 रोजी महात्मा कबीर समता परिषद तर्फे महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार सर्वात कमी वयात यांना मिळाला व या अगोदर राष्ट्रीय पातळीचे राष्ट्रीय वसंतभूषण पुरस्कार व नांदेडरत्न पुरस्कार मिळाले. डॉ. मोहन चव्हाण हे समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा केल्याबद्दल त्यांना…

Read Full News