☆ वसंतरावांजी नाईक व पंचायत व्यवस्था ☆
“वसंतरावजी नाईक साहेब व पंचायत राज व्यवस्था” —————================—————— देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या दशकात ग्रामीण जनतेच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शासनाने अनेक कार्यक्रम राबविले. परंतु म्हणावे तसे यश मिळाले नाही. या कार्यक्रमांचा पुनर्विचार करण्यासाठी केंद्र शासनाने १९५७ साली बलवंत राय मेहता समिती नेमली. या समितीने लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडून विविध शिफारशी केल्या. भारत…