ठाणे,(प्रतिनिधी),सतिष राठोड
गोर बंजारा संघर्ष समिती तर्फे दि .१७ फेब्रुवारी रोजी संध्य्काळी ५:३० वा.बंजारा समाजाचे अाराध्य दैवत संत श्री. सेवालाल महाराज यांची २७६ वी जयंती निमित्त शिवाजी मैदान ठाणे येथे पारंपारिक रिती-रिवाजात,बंजारा भाषेतील वेशभुषात व बंजारा बोली भाषेत गाणी म्हणत महिलांनी भाग घेतले.व भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात अाली.व त्यानंतर सभा घेण्यात अाली असुन,सभेचे अध्यक्ष अाध्र प्रदेशचे माजी मंत्री मा.अमरसिंह तिलावत हे होते,प्रमुख मान्यवरांचे सत्कारही करण्यात अाले.त्यात समाज सेवक रविराज राठोड यांनी सांगितले कि,समाजाला एकत्रीत करण्यासाठी गोर बंजारा संघर्ष समिती स्थापना करण्यात अाली असून,या समिती मध्ये महाराष्टातूनच नाही,तर पूर्ण देशातून बंजारा समाज प्रेमी जुडलेले अाहेत,व निस्वार्थी पणाने समाज सेवा करत अाहेत,बंजारा समाजातील गोर गरीबांचे मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून समिती मार्फत अार्थिक मदत,वह्या-पुस्तक व सामाजिक कार्य व मार्गदर्शन केले जातात.
त्यानंतर सेवा गृपचे अध्यक्श व समाज सेवक मा.मंगल चव्हाण यांनी अापले मनोगत व्यक्त केले,समाजाला जर प्रगती पथावर घेऊन जायचे असेल तर,त्यासाठी शिक्षणाचे महत्व कळून घ्यावे लागेल.अाणि अंधश्रध्देला समाज बळी पडू नये म्हणून अंधश्रध्देपासून समाज दूर राहीले पाहीजे.तसेच समाज सेवक मिलिंद पवार यांनी देखील अापले मनोगत व्यक्त करतांना बोलले कि, महापुरुषांची जयंती साजरा करणे हे कार्य नसून,त्यांचे विचार अाचरणात अाणावे हेच मोठे कार्य अाहे.हाच बंजारा समाज जो पहीले व्यापारी होता,तोच अाज त्या व्यापारांकडे मजूरी करुन अापली पोटजीविका भागवत अाहे.बंजारा समाजाचे मुले वकिल,डाॅक्टर,इंजिनियर,कठेकेदार नाही होऊ शकत का ? होऊ शकतो ! तर त्यासाठी शिक्षण व अापली विचार सारणी महत्वाची असते.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी मा.अमरसिंह तिलावत (माजी मंत्री अांध्र प्रदेश),कर्नाटकचे माजी अामदार मा.मनोहर नायक-ऐनापूर,हे होते.व प्रमुख उपस्थिती गोर बंजारा संघर्ष समिती,भारत.
समाज सेवक व बंजारा समाजातील बंधु अाणि भगिनींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
MUMBAI NEWS http://mumbainewssatish.blogspot.com/